Introduction

सैराट... an 'U/A' Movie?

0 टिप्पणी(ण्या)

Yesterday few of my friends were discussing the latest hit Marathi movie, Sairaat! The discussion was all about whether we should take our kids to this movie or not? I can understand the concern and care of the parents have for their kids. They have full rights to decide what's good and what's bad for their children to watch! No denying! But the real question was why this movie is singled out saying this movie is not fit for the kids!

The most talked about point was that this movie is full of love and lust of adolescent boy and girl. By showing adolescence love story what the director want to show? How can we answer some disturbing queries our kids might ask about their love? This is sheer down gradation of our high culture!

All these queries are raised by reading the whatsapp and FB posts! Most of the people who have these queries have not watched the movie.

This is not the first movie to show love of college goers and surely won't be the last! There is a mention of word 'kiss' a couple of times but this doesn't make the film awkward to watch with family! And apart from last scene there is not at all a free flow of blood in the whole movie! Most of the Bollywood and Tollywood movies have much more blood and skin show! And I mean MUCH more!

So where the 'un-watchable with kids' tag came for this movie? A few whatsapp and Facebook posts have done the trick for this movie?  But why the hell, somebody will write against a movie of which he/she has nothing to do?

'Nothing to do', really? Guys, if someone holds a mirror in  front of your ugly face, it is obvious that we get offended and angry! We don't like to face the reality and surly not when that ugliness involves us!

Most of these posts are from so called 'उच्च जात'. And I'm really very sorry to say they are from my caste. This caste has ruled sugar lobby, education lobby and most importantly Maharashtra's political space is very much occupied by this caste. They are virtually the kings of every aspect of Maharashtra! They have money, power and social 'respect'. They are George Orwell's 'more equals than equal'! So how can you show their wrong doings publicly! They have given fitting replies in Sonai, Javkheda and Khairlanji and even far away in Kolkata! And even after that you dare to show this on a big screen. Not acceptable, boss, not at all acceptable!

'But obviously, you can not kill a director for his movie, right? Then what to do? So come on let's kill his movie!' These WA or FB posts are originated from this mentality! They know the power of 'social boycott'! By these posts they are trying to do the same. Spread a negativity! By this way, they'll sure shape the minds of few people against the movie and change the direction of the discussion to 'how movies can ruin our kids' minds' instead of the message the movie is trying to coney!

Friends, I'm not at all doing PR job for the movie here, but seriously thought of the mentality of these 'high castes'! Believe me guys, this movie is not at all problematic for the kids to watch. My son and most of the kids in the movie hall present that day thoroughly enjoyed the movie. At least the first half before the intervals! Anyways, second part is a heavy dose for the kids! But in the end while showing credentials, my son asked me "आर्ची नि परश्याला का मारलं (why were Archi and Parshya killed)?' And I guess the answer to this question is what really going to shape our future generation!

रायगड...

2 टिप्पणी(ण्या)
रायगड...

सुमारे १० वर्षांपुर्वी ट्रेक करायला सुरुवात केली. तेव्हापासुन 'ट्रेक पंढरी' 'हरिश्चंद्रगड' नि 'मराठी मनाचा मानबिंदु' 'रायगड' करायचाच हा विचार होता. १० वर्षांत भरपुर ट्रेक्स झाले पण हे दोन काही केल्या होतच नव्हते. पण अचानक समजलं की ऑफिसमध्ये माझ्यासारखाच एक ट्रेकवेडा आहे ते! काय आश्चर्य आहे बघा, आम्ही गेले ३ वर्ष एकत्र काम करतोय पण एकमेकांच्या ट्रेकच्या आवडीबद्दल आम्हाला मागच्या एप्रिलमध्ये शोध लागला. मग काय ऑफिसच्या वेळा सांभाळुन हे वेड वाढवायच असे आम्ही दोघांनी ठरवलं. त्यानुसार एप्रिलमध्ये राजमाची झाला. आणि परत एकदा ह्या वेडाला ब्रेक लागला, कारण आपलं नेहमीचचं 'दर शनिवार किंवा रविवारी कामाला यावे लागेल' अस त्याच्याही बॉसने त्याला आणि माझ्या बॉसने मला सांगितलं.

नंतर मात्र दोघांनीही ठरवलं, बस्स! आता कुठेतरी जायचच. नाही... नाही, कुठेतरी नाही, 'हरिश्चंद्रगड'लाच जायचं. कशी काय कोण जाणे पण ऑफिसमध्ये बातमी फुट्ली आणि आमचा फुगा! सगळं ठरलं, एकूण २० जण तयार झाली. सगळी तयारी झाली आणि माझ्या बॉसने मला माझ्या पुर्ण टीमसह पुढील २ रविवार कामाला यायला सांगितलं. मग काय शेवटी २ आठवड्यांनंतर हा ट्रेक देखील पुर्ण झाला. आता 'रायगड' बाकी होता. ह्या ट्रेकला थोडा ब्रेक घेऊन जायचं ठरलं. पण 'हरिश्चंद्रगड'च्या ट्रेकला काहीजण प्रथमच आले होते. त्यांनी माझ्यामागे भुणभुण चालु केली. त्यामुळे लगेच महिन्याभरात हा ट्रेक करायचा अस ठरलं. त्यातही मेव्हण्याचा लग्नामुळे हा ट्रेकपण एकदा पोस्ट्पोन झालाच! शेवटी २८-२९ चा मुहुर्त निघाला. (अक्षरशः मुहुर्तच, कारण आमच्या ऑफिसमधल्या 'गोखल्यांनी' सांगितल की २९ हा चांगला दिवस आहे ते!)

२८ला रात्री ८ वाजता कार्यालयातुन १२ जण निघालो. नेट्वर पाचाड्ला जाणारी 'डायरेक' गाडी आहे का ते बघितलं. रात्री १० वाजता बोरिवली वरुन 'बोरिवली - सांदोशी' गाडी आहे हे समजल. म्हटलं चला बरं झालं, रात्रीचं अधेमधे कुठं ऊतरायला नको. बेलापुरलाच एका हाटीलात सामिष भोजन घेतले. त्यातपण आम्ही सगळे एवढे आगाऊ की एका जैन मित्रालाच सांगितले की आम्ची आर्डर तुच दे. ज्या शिव्या खाल्यायेत म्हणुन सांगु! पण शिव्यांनंतर बटर चिकन बरं लागतं असं एकंदरित सगळ्यांचच मत पडलं!

जेवण झाल्या झाल्या थेट पनवेल गाठले. रात्रीचे ११ वाजले होते. विचार केला की बोरिवलीवरुन १० वाजता सुटणारी गाडी साधारणपणे ११-११:१५ पर्यंत येईल. कंट्रोलरकडे गाडीची चौकशी केली तर ते म्हणाले की ती गाडी कधीच बंद झालीये. आयला! हे काय नवीन! आम्ही त्यांना बोललो की 'अहो पण तुमच्या साईट्वरतर ह्या गाडीचं आरक्षण घेतात.' उत्तर मिळालं की 'अहो, नेट कधी अपडेट करतात का?' म्हटलं असेल बाबा, सर्कारी साईट आहे शेवट्ची कधी अपडेट केली असेल कुनास ठाऊक? त्यांनीच माहीती दिली की तुम्ही इथुन महाडला जा, तिथुन ७:३० ची बस आहे पाचाडला जायला. हो नाही करता करता महाडला निघालो.

पहाटे २:३० वाजता महाडला पोहोचलो. पाचाडला जाण्यासाठी काही सोय आहे का ह्याची माहिती काढायाला सुरुवात केली. तिथे एक आनंदाची बातमी समजली 'बोरिवली - सांदोशी' बस काहीही बंदबिंद झालेली नाहीये, आणि ती साधारण ४ वाजेपर्यंत महाडला पोहोचते. जाम शिव्या घातल्या पनवेलच्या कंट्रोलरला! पाचाडला ४:४५ला पोचलो. आणि कुठेही न थांबता लगेच गडाकडे कुच केले.

सकाळची वेळ... पण थंडी कुठे गायब झाली होती काय माहित? पाच मिनिटांच्या चालीनंतर सगळ्यांच्या अगांतले जॅकेट्स निघाले. चालत्या बसमध्ये हवेहवेसे वाटणारे जॅकेट्स आता ओझं वाटु लागले होते. पण सगळ्यांना 'आता एकच लक्ष आणि पायतळी अंगार' ही अवस्था झाली होती. लवकरात लवकर वर (म्हणजे किल्ल्यावर!) पोचायचं हाच एक विचार होता. तसा रुढार्थाने हा काही ट्रेक म्हणता येणार नाही कारण अगडी शेवटपर्यंत पायर्‍या आहेत. पण सरळ चढाईमुळे त्या अंगावर येतात. कसेबसे ६:३० पर्यंत महादरवाज्यापर्यंत पोचलो. आणि एक फोटोसेशन उरकले. पटापट पुढील चढाई चालु केली कारण गडाचा पसारा फार मोठा आहे आणि तो फिरायला वेळ लागणार आहे हे माहित होते.

एकदाचे पोचले गडावर वेळ सकाळी साधारण पावणे सात... गडावरील गंगासागर तलावात राजवाड्याचे अवशेषांचे प्रतिबिंब बघितले आणि त्याचे प्रतिबिंब आमच्या मनात उतरले. आणि आम्ही सगळे गड बघायला निघालो.

सगळ्यात पहिल्यांदा राणी महाल पाहिले. एकुण ७ महाल होते. राजांना ८ राण्या होत्या पण महाल फक्त सातच! ह्याचे कारण नंतर समजले की सईबाई ह्या किल्ला बनवण्याच्या अगोदरच निधन पावल्या होत्या. आणि महाराजांच्या म्हणण्यानुसार सईबाईंची जागा महाराजांच्या हृदयात होती, त्यांच्यासाठी वेगळा महाल बांधायची गरज नव्हती. (ही आख्यायिका कशी समजली ह्याची कहानी नंतर येईलच!) तिथुन राजांचा महाल बघायला गेलो. हे अवशेष पाहुनच गडाची श्रीमंती समजत होती. गड जागता असताना हे सर्व राजवाडे किती प्रचंड असतील ह्याची कल्पनाच करवत नाही!

महाराजांचा राजवाडा पाहुन आम्ही ’सदरे’वर गेलो. ह्या सदरेवरच राजांचा राज्याभिषेक झाला होता. ईंग्रजी सत्ता इथेच राजांसमोर नतमस्तक झाली. इथेच राजांचे ३२ मण सोन्याचे सिंहासन होते. ह्या सिंहासनाचा आता काहीच मागमुस नाहीये, दुर्दैव! जिथे आता महाराजांची मेघडंबरीत बसलेली मुर्ती आहे. राजांची मुर्ती सकाळच्या कोवळ्या उन्हात बघुनच सर्वांचे हात आपोआप जुळले गेले. इथेच एका माणसाने आम्हाला एक आश्चर्य दाखविले. सदरेसमोरच एक कमान आहे, ह्या कमानी मध्ये व सदरेमध्ये बरेच अतंर आहे. पण कमानीखाली उभे राहुन त्या माणसाने एक कागद फाडुन दाखविला ज्याचा आवाज आम्हाला सदरेवर अगदी व्यवस्थित ऐकु आला. 'सिव्हील' आणि 'अ‍ॅकॉस्टिक' इंजिनिअरींगचा त्या काळातील हा अभ्यास पाहुन खरचं मंत्रमुग्ध व्हायला होतं.

तिथुन आम्ही होळीचा माळ, इथे महाराजांच्या काळात होळीचा सण साजरा व्हायचा, इथे आलो. होळीच्या माळावर महाराजांची सर्वात प्रसिद्ध मुर्ती आहे. होळीच्या माळासमोरच भव्य बाजारपेठ आहे. ह्या बाजारपेठेच्या रस्त्याची रुंदी सुमारे ४० फुट आहे.

इथुनच जगदिश्वराच्या मंदिराकडे जायचा रस्ता आहे. जगदिश्वराच्या मंदिरासमोरच महाराजांची समधी आहे.समाधीसमोर नतमस्तक झालो. तिथे समोरच 'वाघ्या'ची स्माधी आहे. ह्या समाधीच्या 'संरक्षणा'साठी दोन पोलिस होते. अख्या जगात हा एकच कुत्रा असा असेल की ज्याच्या संरक्षणासाठी पोलिस असावेत.

समाधी व जगदिश्वराचे दर्शन घेऊन आम्ही सरळ टकमक टोकाकडे गेलो. तिथे काहीजण 'रॅपलिंग' करायला आली होती. त्यांना रॅपलिंग करताना पाहुन मला माझ्या नुकत्याच रॅपलिंग करताना मृत्युमुखी पडलेल्या मित्राची, संदीपची' आठवण झाली नि मन उदास झालं.

तिथुन जेवायला गेलो. एक सुचना... जेवणाची योग्यप्रकारे चौकशी करुनच कुणालाही जेवण बनवायला सांगणे. कारण आम्हाला ४० रु.मध्ये २ भाकर्‍या, ठेचा, पिठले आणि एक्स्ट्रा भाकरी ८रु. असं कबुल करुन नंतर एक्स्ट्रा भाकरी म्हणजे एक एक्स्ट्रा प्लेट अशाप्रमाणे पैसे घेण्यात आले. म्हण्जे एक एक्स्ट्रा भाकरी आम्हाला ४० रु.ला पडली.

मग उतरायला सुरुवात केली. उतरताना कल्याणच्या एक कॉलेजच्या 'कुलकर्णी' म्हणुन प्रोफेसर भेटल्या. त्यांनी माझ्या गळ्यातल्या कॅमेराकडे बघुन माझ्याकडे फोटो पहायची इच्छा व्यक्त केली. मग फोटो बघता बघता आमचा इतिहासाचा क्लास घेतला. (चांगल्या अर्थाने!) वरील राणी महाल, होळीचा माळावरील महाराजांच्या मुर्तीबद्दल कथा ह्या गोष्टींची माहीती ह्या मॅडमनीच आम्हाला दिली.

तिथुन महाडमार्गे पनवेलला परत आलो. आणि एका आणखी ट्रेकची सांगता झाली.

राजवाडा




राजवाडा २




कलाकुसर




प्रचि ३


प्रचि ४


राणीमहाल



प्रचि ५



महारा़जांचा महाल


प्रचि ६


प्रचि ७



4 ediots



मेघडंबरी


कमान


जगदिश्वराचे मंदिर




महाराज



बाजारपेठ


हा खेळ सावल्यांचा




वाघ्या




हिरोजी इंदुळकर




प्रचि १७




प्रचि १८




क्षणभर विश्रांती

Rest for a moment


शिलालेख




समाधी



तटबंदी




प्रचि १९